ंमुंबईतील मराठमोळी वस्ती. लाऊड स्पीकरवर हिंदी सिनेमातील नव्या हीट गाण्यांसह मराठीची कोंबडी पळाली आणि आयचा घो येडा झाला काय रे अशी रापचीक मालाची गाणी वाजत असतात. अधूनमधून श्री प्रभुरामचंद्रांची महती सांगणारी गाणी देखील सुरू आहेत. येथूनच निघालेल्या विष्णू आणि नारदाच्या कानावर ही गाणी पडतात. त्यामुळे विष्णूचे कुतूहल जागृत होते. ते नारदाला विचारतात.
विष्णू : गवरी, गणपती, शिमगा सगळे झाले. आता हा आणि कसला उत्सव आहे.
नारद : देवा असे काय करता. आज प्रभू रामचंद्र नाही का जन्माला येणार ?
विष्णू : अरे हो. लक्षातच नाही राहिलं माझ्या. पण ही रापचीक माल है सारखी गाणी कशाला इथं ?
नारद : देवा तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. आपल्या गणेशासह प्रभू राम ते अगदी रामभक्त हनूमानालाही या सारख्या गाण्यांची सवय झालीय. दरवर्षी ते पृथ्वीवर येतात. त्यांना माहीत आहे सगळं
विष्णू : असो, चल आपणही राम जम्मोत्सवात सहभागी होऊ या
नारद : चला तर मग
(दोघेही राम जन्म पाहायला थांबतात. दुपारचे बारा वाजतात. राम जन्माला येतो, 'राम जन्मला ग बाई राम' अशी हाकाटी होते. मात्र यावेळी थोडं विपरीत घडलं दरवर्षी हासणार राम यावेळी मात्र हसला नाही. त्यामुळे सारेच चिंतेत पडले.)
विष्णू : रामाच्या चेहऱ्यावर एवढी उदासीनता का? तो हसतही नाही.
( सगळे भक्त रामला हसवण्यासाठी प्रयत्न सुरू करता. कोणी खेळणी आणतो, कोणी धन्युष्य बाण हातात देतो, पण काही उपयोग होत नाही.)
नारद : देवा मला वाटतं प्रभूरामचंद्राचं काही तरी बिनलं असणार. पृथ्वीवर रामराज्य आणण्याची भाषा केली जाते. पण येथे महागाई, बेकारी, दहशतवाद, दारीद्रयाने जनतेचा जीव मेटाकुटीला आला आहे. सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे.
विष्णू : हो खरय तुझं राम राज्य म्हणजे सुरक्षा, सुबत्ता, स्थैर्य यांचा मिलाफ असतो. पण रामाला आपल्या खऱ्या राज्यात दहा तोंडाच्या रावणाला मारणं शक्य झालं. मात्र आता सर्व सामान्यांसमोर उभ्या राहिलेल्या समस्या रुपी रावणाला कसं मारायचं याची चिंता पडली असणार. लोकांच्या अपेक्षेला आपण उतरलो नाही तर आपणावरही कोणी विश्वास ठेवणार नाही असे त्याला वाटतयं
(विष्णू मनाशी निर्धार करतात आणि रामाच्या कानाशी जाऊन पुटपुटतात 'ऑल इज वेल" आणि रामाच्या चेहऱ्यावर हास्य पसरतं.)
..............