पृथ्वीवर सध्या बरीच सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र अनेक घडामोडींची इत्थंभूत माहिती भगवान विष्णूपर्यंत पोहचत नाही त्यामुळे ते सध्या फारच अस्वस्थ झाले आहेत. याच विषयावरून त्यांनी नारदांना नुकतेच फैलावर घेतले. लक्ष्मीनेही नारदाबाबत तक्रार केल्याने विष्णू अधिकच संतापले होते. 24 तास न्यूज चॅनेल पाहूनही विष्णूला आवश्यक ती माहिती मिळत नाहीय. त्यामुळे अखेर पृथ्वीवर जाऊन स्वतः:च माहिती घेण्याचे मनाशी ठरवून विष्णूंनी नारदाला सोबत घेऊन पृथ्वीवर येण्याचे ठरवले. विष्णू आणि नारद कधी अदृश्यपणे तर कधी वेश पालटून सर्व गोष्टींचा मागोवा घेणार आहेत...
(विष्णू आणि नारद यांच्या या गुप्त दौऱ्याची खबर मात्र आम्हाला सूत्रांकडून मिळाली असून त्यांच्या हलचालीची खडनखडा माहिती आम्ही वाचकांना या ब्लॉगवरून "विष्णू -नारद ' या सदरातून वेळोवेळी देत राहू जसजशी खबर मिळेल तशी वाचकांना कळवत राहू... तोपर्यंत आम्ही प्ले करतो आहोत हे एक आपल्या आवडीचे गाणे... )
No comments:
Post a Comment